तहान भुक विसरुनी
देश सेवेत झाला भर्ती.
सुवर्ण अक्षरांनी वर्णावी
अशी तुझी महान कीर्ती.
सळसळते वीर रक्त
अन् नजरेत भडके ज्वाळा.
कुणी नजर वाकडी टाकता
ठार केलेस दुश्मनाला .
घर वात्सल्याचे सोडून
निकट केले मरणाशी.
वीर,अशोक , शौर्य चक्र
फिरती तुझ्या पायापाशी.
तुझ्याच कीर्तीचे पोवाडे
अन् शौर्याचे ते नगाडे.
धाडसी पराक्रमी धडे
गिरवता आभाळ कमी पडे.
रिंग वाजता मोबाईल ची
काळीज फाटे बायका - पोरांची.
किंचाळीत पडला प्रश्न तिला.....
कशी ओढू रे गाडी संसाराची...........
वेळ तिरंग्यात लपेटुन येण्याची
अन् ती गर्दी झाली पाहण्याची.
ताठ मानेने सलामी देताना
वाटे हरपली वीर रत्ने भारताची....
वाटे हरपली वीर रत्ने भारताची....